७५० वा. श्रींचे जन्मोत्सवी वर्षा निमित्त सप्ताह भेटीत ग्वाही
सोहळ्यास भाविकांचा उदंड प्रतिसाद
आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या ७५० व्या जन्मोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आळंदी सप्ताहास विशेष भेट दिली. त्यांनी ज्ञानभूमी प्रकल्पाच्या प्रगतीबाबत आढावा घेत या प्रकल्पाला प्राधान्याने गती देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले.
या भेटीदरम्यान, मंत्री बावनकुळे यांनी आळंदी देवस्थान समितीच्या विश्वस्त मंडळा संमवेत प्रकल्पाच्या विविध पैलूंवर चर्चा केली. सुमारे ४५० एकरवर जागेत साकारणाऱ्या या प्रकल्पाची माहिती जाणून घेतल्यानंतर, त्यांनी या प्रकल्पाचे महत्त्व अधोरेखित केले. ते म्हणाले, "ज्ञानभूमी प्रकल्प केवळ वारकऱ्यांसाठीच नव्हे, तर राज्याच्या आध्यात्मिक आणि सांस्कृतिक विकासास महत्त्वाचा आहे. हा प्रकल्प पूर्णत्वास नेण्यास शासनाचे पूर्ण सहकार्य मिळेल. प्रकल्पाच्या प्रगतीसाठी आवश्यक असणारी सर्व मदत शासन स्तरावरून केली जाईल. प्रकल्पाच्या माध्यमातून वारकऱ्यांसाठी आधुनिक सेवा सुविधा उपलब्ध करून देण्याचा शासनाचा मानस आहे. प्रकल्पाच्या माध्यमातून आळंदीच्या आध्यात्मिक आणि सांस्कृतिक वैभवात भर पडेल असे त्यांनी सांगितले. माऊलींच्या ७५० व्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने महाराष्ट्भर मोठे कार्यक्रम, उपक्रम, उत्सव व्हावे यासाठी शासन स्तरावर शासन निर्णय घेतला जाईल. या बाबतची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उत्सवात भूमिका स्पष्ठ करतील.
आळंदी येथे सुरू असलेल्या भव्य सोहळ्यात राज्याच्या विविध भागातून हजारो भाविक उपस्थित आहेत. आळंदीतील कार्यक्रमस्थळी भाविकांना अध्यात्मिक पर्वणी लाभली आहे. भक्तिमय वातावरणात कार्यक्रम हरिनाम गजरात सुरु आहेत. परिसरातून देखील मोठा प्रतिसाद मिळाला आहे. देवस्थान तर्फे श्रींची मूर्ती आणि प्रतिमा तसेच तुळशीहार, उपरणे घालून त्यांचा सत्कार सर्व विश्वस्त आणि ग्रामस्थ यांचे हस्ते करण्यात आला.


Post a Comment
0 Comments