संत साहित्य आणि मुलांना हरिपाठाचे वाटप उत्साहात
आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : येथील चाकण मधील पुणे जिल्हा परिषद कडाची वाडी प्राथमिक शाळेत ओळख हरिपाठाची या शालेय मुलांसाठी असलेल्या संस्कारक्षम, शालेय मुलांचे मूल्य संवर्धन उपक्रमास हरिनाम गजरात प्रारंभ झाला. यावेळी प्रशालेस संत साहित्य आणि मुलांना हरिपाठाचे वाटप उत्साहात करण्यात आले.
या प्रसंगी व्यासपीठावर इंद्रायणी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष तुकाराम अण्णा गवारे, माजी मुख्याध्यापिका संगीता वाघमारे, अद्वैत डेव्हलपर्स माजी मुख्याध्यापिका रोहिणी कड, ओळख श्री ज्ञानेश्वरी परिवार सदस्य विश्वंभर पाटील, विलास वाघमारे, सोपान काळे, अर्जुन मेदनकर, काळुराम येळवंडे, मुख्याध्यापिका नयना पाटील, निवृती भुकन, गणेश सटाले, वसंतराव कड, तंटा मुक्ती समिती अध्यक्ष दत्तात्रय खांडेभराड यांचेसह शिक्षक, पालक आदी मान्यवर उपस्थित होते.
श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या ७५० व्या जन्मोत्सवी वर्षा निमित्त पुणे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेस माऊलींची लक्षणीय प्रतिमा भेट देत श्रींचे प्रतिमा पूजन, साहित्य पूजन करीत संतविचारधन प्रशालेस मान्यवरांचे हस्ते सुपूर्द करण्यात आले. यावेळी अध्यक्षस्थानी इंद्रायणी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष तुकाराम अण्णा गवारे होते. श्री ज्ञानेश्वर महाराज चरित्र समितीचे अध्यक्ष प्रकाश काळे यांचे नियोजनात उपक्रमाचे आयोजन उत्साहात करण्यात आले.
यावेळी रोहिणी कड, संगीता वाघमारे, तुकाराम अण्णा गवारे, काळुराम येळवंडे आदींनी मुलांना मार्गदर्शन करीत ओळख श्री ज्ञानेश्वरी एक परिवार आळंदी यांचे माध्यमातून सर्व घटकांचे वतीने मुल्यसंवर्धन उपक्रमा विषयी माहिती मान्यवरांनी देत मुलांशी संवाद साधला. या मार्गदर्शनातून मुलांशी संवाद साधत मुल्य शिक्षण काळाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
माजी मुख्याध्यापिका रोहिणी कड यांनी उपक्रमाचे यशस्वीतेत मुलांना बक्षिसे वाटप देखील होणार असल्याचे सांगितले. मुलांना अधिक प्रेरणा देत प्रेरणादायी उपक्रम प्रशालेने स्वीकारल्या बद्दल प्रशालेचे आभार व्यक्त करण्यात आले. यावेळी शालेय मुलांसाठी असलेल्या या संस्कारक्षम उपक्रमास अधिक गती देऊन मुलांमध्ये मूल्यसंस्कार रुजवात यासाठी सर्व शिक्षकांनी देखील या उपक्रमाचे स्वागत करीत प्रशालेत यशस्वी केला जाईल अशी ग्वाही शिक्षकांनी दिली.
गीता, हरिपाठ पाठ, श्री ज्ञानेश्वरी तील एक तरी ओवी अनुभवावी यासाठी शालेय मुलांना मार्गदर्शन करीत उपक्रमात सातत्य ठेवण्याचे आवाहन यावेळी तुकाराम अण्णा गवारे यांनी केले. वर्षा अखेर मुलांचे संत साहित्यावर आधारित परीक्षा घेऊन प्रथम १० क्रमांक प्राप्त मुलांस बक्षिसे देण्यात येतील असे गवारे यांनी सांगितले. शालेय मुलासाठी सुरू केलेला प्रेरणादायी उपक्रम शाळेत सतत चालू राहील असे यावेळी प्रशालेने जाहीर केले. गणेश सटाले यांनी आभार मानले. पसायदान गायनाने उपक्रमाची हरी नाम जयघोषात सांगता झाली.

Post a Comment
0 Comments