अलंकापुरीत रमा एकादशी दिनी गोवत्स पूजन उत्साहात
द्रायणी नदी घाटावर इंद्रायणी आरतीसह घाट स्वच्छता उपक्रम
आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : आळंदीतील धार्मिक महत्त्व लक्षात घेत यावर्षी रमा एकादशी दिनी वसुबारस आल्याने गोवत्स पूजन आणि एकादशी विविध धार्मिक उपक्रमांनी परंपरांचे पालन करीत साजरी करण्यात आली. माऊली मंदिरात श्रींचे गाभाऱ्यात लक्षवेधी पुष्प सजावट करीत वसुबारस देखील साजरी करण्यात आली. यावेळी भाविकांनी श्रींचे दर्शनास गर्दी केली. मंदिरात परंपरांचे पालन करीत दिवाळी पहाट कार्यक्रमातील संगीत मेजवानी हरिनाम गजरात संगीतमय वातावरणात सुरु झाली. इंद्रायणी आरतीसह नदी घाटावर स्वच्छता उपक्रम सामाजिक बांधिलकीतून उत्साहात राबविण्यात आला.
माऊली मंदिरात रमा एकादशी, वसुबारस विविध धार्मिक उपक्रमांनी साजरी झाली. माऊली मंदिरात भाविकांनी दर्शनास गर्दी केली होती. दर्शनास भाविकांनी पहाटे पासून रांगा लावून दर्शन घेतले. मंदिरात लक्षवेधी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. परंपरांचे, धार्मिक कार्यक्रम आणि पहाटे दिवाळी पहाट हा संगीत मेजवानी देणारा उपक्रम आळंदी देवस्थानचे वतीने सुरु झाल्याचे व्यवस्थापक माऊली वीर यांनी सांगितले. दिवाळी मधील पहिला दिवस संगीत हृदयस्पर्शी आवाजात संगीत मेजवानी श्रवणास भाविकांना मिळाली. वसूबारस हा सण आपल्याला निसर्गाशी जोडून घेण्याचा सण आहे. वसुबारस अंतर्गत गोवत्स पूजन करण्यात आले. आळंदी परिसरात दिवाळीस उत्साहात सुरुवात झाली. पहिल्या दिवसी वसूबारस म्हणजे गाई व तीचे वासरू यांची पुजा करण्याचा दिवस होय. गाई ही आपल्याला निसर्गाने दिलेली देणगी आहे. पंच महाभूते यांचा समन्वय करून पर्यावरणाचा समतोल ठेवण्याचे कार्य गाई करते, शेतीसाठी लागणारे सर्व खते, औषधे, मानवास उत्तम आहार गाई देते. यामुळे या गाईंचे महत्व अनन्यसाधारण आहे. हे महत्त्व ओळखून आळंदीतील श्रीरामकृष्ण वारकरी शिक्षण संस्था, आळंदी शहर भाजप तसेच सामाजिक कार्यकर्ते गणेश गरुड, गणेश हुलावळे, गणेश दाभेकर आदींचे संकल्पने तून परिसरात विविध ठिकाणी गोवत्स पूजा उत्साहात करण्यात आली. गाई वाचली तरच निसर्ग वाचणार आहे, निसर्ग वाचला तरच आपण राहणार आहोत, यामुळे आपले जीवन वाचविण्यास व आनंदी जीवनासाठी गाई आपल्यात आवश्यक आहे. यामुळे वसुबारस दिनी गाईची पुजा मोठ्या उत्साहात करण्यात आली. आळंदी पंचक्रोशीत गाई वाचविण्यासाठी सहकार्य करण्याचा संकल्प करण्यात आला. गाई तुमचे जीवन आनंदाने, समाधानाने भरून टाकील. निसर्ग भरभरून देईल. यासाठी जनजागृती करण्यात आली. श्रीरामकृष्ण वारकरी शिक्षण संस्थेत अध्यक्ष मोहन महाराज शिंदे, सचिन महाराज शिंदे यांचे मार्गदर्शनात गोवत्स पूजन उत्साहात झाले.
आळंदी पंचक्रोशीत ठीकठिकाणी गोवत्स पूजनास आवाहन करण्यात आले होते. भारतीय संस्कृतीत गो माता पूजन महत्त्वाचे मानले जाते. गो मातेच्या कृतज्ञते साठी वसुबारस निमित्त गोवत्स पूजन करण्यात आले. आळंदी शहर आणि पंचक्रोशीत अनेक ठिकाणी गोवत्स पूजनाची व्यवस्था करण्यात आली होती. यास परिसरातून मोठा प्रतिसाद मिळाल्याचे संवेदना फाउंडेशनचे अध्यक्ष गणेश गरूड यांनी सांगितले. शहरात ठिकठिकाणी गोमाता पूजनाची व्यवस्था करण्यात आली होती. नागरिक, महिलांनी तसेच गो पूजकाने या सोयीचा लाभ घेण्याचे आवाहन गरुड यांनी केले होते. आळंदी परिसरातील सार्वजनिक मठ, मंदिरे, चौक परिसरात सामाजिक कार्यकर्ते, गोपालक यांच्या सहकार्याने व्यवस्था करण्यात आली होती. नागरीकांनी येऊन गोवत्स पूजा करण्याचे आवाहन गणेश गरूड यांनी केले होते. या प्रथा परंपरां जोपासण्याचे कार्यात गोभक्त, गोपालक, गोरक्षक यांनी सहभाग घेतल्याचे गणेश गरुड यांनी सांगितले.
माऊली गोशाळेचे वतीने गो मातेची मिरवणूक श्री गणेश हुलावळे यांचे मार्गदर्शनात काढण्यात आली. यावेळी परिसरातील गोभक्त पालक, नागरिकांनी गो पूजन उत्साहात केले. गोवत्स पूजनास भाविकांची मोठी गर्दी झाली होती.
इंद्रायणी नदी घाटावर इंद्रायणी आरतीसह नदी घाट स्वच्छता उपक्रम
तीर्थक्षेत्र आळंदी ग्रामस्थ इंद्रायणी आरती ग्रुप, राजमाता जिजाऊ महिला प्रतिष्ठान, महिला बचत गट सदस्य, आळंदी जनहित फाउंडेशन, पदाधिकारी, महिला मंडळ तसेच आळंदी ग्रामस्थ यांचे वतीने इंद्रायणी नदी घाटावर घाट स्वच्छता करीत इंद्रायणीची आरती हरिनाम गजरात झाली.
यावेळी राजमाता जिजाऊ महिला प्रतिष्ठान अध्यक्षा अनिता झुजम, महिला बचत गट महासंघ अध्यक्षा सुवर्णा काळे, म्हाळसाबाई मोरे, शोभा कुलकर्णी, कौसल्या देवरे, सरस्वती भागवत, काशीबाई अडीकीने, जयश्री भागवत, सिनीता हेळे, पुष्पक लेंडघर,वनिता मगरुळे, सुरेख काळभोर, शिवसंदेश यतेचे प्रमुख जनार्धन महाराज पाटील, आळंदी जनहित फाउंडेशनचे कार्याध्यक्ष संयोजक अर्जुन मेदनकर, आळंदी उपशहर प्रमुख माऊली घुंडरे, शाखा प्रमुख रोहिदास कदम, गोविंद ठाकूर पाटील, उदय काळे, राजेंद्र जाधव आदींसह महिला भाविक, आळंदीकर ग्रामस्थ उपस्थित होते. इंद्रायणी नदीचे पावित्र्य जोपासण्यासाठी इंद्रायणी नदी घाटावर आरती उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमात सर्वानी सहभागी व्हावे असे आवाहन राजमाता जिजाऊ महिला प्रतिष्ठान अध्यक्षा अनिता झुजम यांनी केले. इंद्रायणी नदीत निर्माल्यादी वस्तू, कपडे कचरा, तुटलेले फोटो, काचा न टाकण्याचे आवाहन करण्यात त्यांनी केले. तीर्थक्षेत्र आळंदी ग्रामस्थ, इंद्रायणी आरती ग्रुपचे वतीने संयोजिका अनिता झुजम, संयोजक अर्जुन मेदनकर यांनी उपक्रमाचे आयोजन केले. स्वच्छ आळंदी, सुंदर आळंदी हरित आळंदीसाठी जनजागृती करीत इंद्रायणी नदी घाटावर स्वच्छता करीत स्वच्छतेकडे लक्ष वेधण्यात आले. यावेळी शिवसंदेश यात्रेचे प्रमुख जनार्धन महाराज पाटील यांचे हस्ते इंद्रायणी आरती उत्साहात करण्यात आली. पसायदानाने उपक्रमाची सांगता करण्यात आली. यावेळी इंद्रायणी नदी घाटावर भगवा ध्वज स्तंभावर नवीन भगवा ध्वज लावण्यात आला. इंद्रायणी नदी घाटावर भाविकांनी दिंड्यातून प्रदक्षिणा करीत रमा एकादशी साजरी केली. माऊली मंदिरात दिवाळी निमित्त दीपोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. श्रींचे गाभार्यात लक्षवेधी पुष्प सजावट करण्यात आली होती.



Post a Comment
0 Comments