पर्यावरण संवर्धन काळाची गरज - अर्जुन मेदनकर
आळंदीतील वडगाव चौक ते आरएचटीसी - आळंदी, मरकळ रोड पर्यंत आरोह, पर्यावरण विषयक संदेश देत जागरूकता रॅली झाली. यावेळी आळंदी नगरपरिषद माजी उपाध्यक्ष सागर भोसले, आवेकर भावे रामचंद्र संस्थान श्री राम मंदिर ट्रस्टचे विश्वस्त अर्जुन मेदनकर, कालिदास तापकीर, प्रसाद कवडे आदी उपस्थित होते. यावेळी अर्जुन मेदनकर म्हणाले, आळंदी पंचक्रोशीत मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड संकल्प असून वृक्षारोपण आणि पर्यावरण संवर्धन हि काळाची गरज आहे.
या रॅलीचा उद्देश युनायटेड फॉर ह्युमन, अॅनिमल अँड एन्व्हायर्नमेंटल वेल बीइंग या विषयावर जागरूकता निर्माण करण्यासाठी समाज प्रबोधन हा उद्देश होता. या रॅलीमध्ये वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय इंटर्न, नर्सिंग विद्यार्थी, पॅरा मेडिकल स्टाफ, पशुवैद्यकीय डॉक्टर, आशा वर्कर्स, शालेय विद्यार्थी, ग्रामपंच सदस्य आणि सरपंच, पोलिस कॉन्स्टेबल, एनजीओ, पत्रकार आणि स्थानिक जनता यासह विविध विभागातील २०० हून अधिक लोकांनी सहभाग घेतला. यावेळी विविध मान्यवरांनी मार्गदर्शन करीत समाज प्रबोधन केले.


Post a Comment
0 Comments